Dilipraj Prakashan
नेहरूंच्या ११५ घोडचुका | Nehrunchya 115 Ghodchuka By Rajnikant Puranik
नेहरूंच्या ११५ घोडचुका | Nehrunchya 115 Ghodchuka By Rajnikant Puranik
Couldn't load pickup availability
घोडचुका’ हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल.
नेहरूंनी केलेल्या घोडचुकां्च्या मालिकेचा वर्णपट उलगडायचा ठरवला तर त्याची व्याप्ती फारच मोठी आहे असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही. नेहरूंनी राजकारणात सत्तेसाठी घराणेशाहीचा आग्रह धरला नसता, तर त्यांच्या कालखंडाच्या सत्तेसाठी घराणेशाहीचा आग्रह धरला नसता, तर त्यांच्या पहिल्या जगातील देश बनण्याच्या मार्गावर चालू लागला असता.. आणि १९८०च्या पूर्वार्धापर्यंत तरी तसे चित्र नक्की दिसले असते.. पण दुर्दैवाने नेहरूंच्या कालखंडाने भारतात गरिबी, विपन्नावस्था आणि दु:खाचा पाया घातला आणि त्याला कायमचेच विकासाच्या दिशेने वाटचाल करणार्या, अगदी कनिष्ठ दर्जाच्या, तिसर्या जगातील यादीत नेऊन बसवले. या घोडचुकांची कालानुक्रमाने मांडणी केल्याने हे पुस्तक एकंदरीत वरकरणी वरवर दिसणार्या देखाव्यामागे असणार्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकते.
Share
